संविधान

"आम्ही,भारताचे लोक,भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही
गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व
नागरिकांस : सामाजिक,आर्थिक व
राजनैतिक न्याय; विचार,अभिव्यक्त
ी,विश्वास,श्रद् धा व उपासना यांचे
स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता;
निश्चित पणे प्राप्त करुन
देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये
व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन
देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा
गांभिर्यपूर्वक निर्धार करुन ;
आमच्या संविधानसभेत आज दिनांक 26
नोव्हेंबर,1949 रोजी याद्वारे हे संविधान
अंगीकृत आणि अधिनियमित करुन
स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.